

आमच्याबद्दल
ग्रामपंचायत चौक ही गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आमचा उद्देश सोपा आहे — चांगली पायाभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि प्रत्येक नागरिकाला आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे.
आम्ही नागरिकांशी समन्वय साधून प्रत्येक सरकारी योजना, सुविधा आणि मदत योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करतो.
आमचे ध्येय
आमचे उद्दिष्ट
- कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासन प्रदान करणे
- गावातील पायाभूत सुविधा आणि स्वच्छता सुधारणे
- सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे
- ग्रामीण विकास आणि रोजगाराला पाठबळ देणे
- नागरिकांचा सहभाग वाढवणे
आमची टीम
गावाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या समर्पित सदस्यांद्वारे आमची पंचायत चालवली जाते:
सरपंच – रितू ठोंबरे – 7507225333
उपसरपंच – पूजा हातमोडे – 7517964040
ग्रामसेवक – जी एस मोरे – 8605194104
ग्रामपंचायत ऑपरेटर – उमेश भोईर – 9922220496
पाणी पुरवठा विभाग – मयूर देशमुख – 9146858405
तलाठी – अक्षय गावडे – 8552012100
पोलिस पाटील – हातणोली – 8446615749
पोलिस पाटील – जांभिवली – 9503055163
पोलिस पाटील – नानिवली – 9082088262
पोलिस पाटील – चौक – 8805914654
आमच्या सेवा
- RO प्लांट स्थापना – ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
- CCTV कॅमेरे कार्यान्वित – संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली.
- AI Lab (सरणौबत नेताजी पालकर विद्यालय) – विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात आली.
- रस्ते व गटार काँक्रिटीकरण – गावातील पायाभूत सुविधा मजबूत करून सर्व रस्ते व गटार पक्के करण्यात आले.
- शिवस्मारक उभारणी (चौक) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात आले.
- इरसालवाडी पुनर्वसन – आपत्तीग्रस्त नागरिकांचे सुरक्षित व सुसज्ज पुनर्वसन करण्यात आले.
- सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प (चौक) – स्वच्छता व पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक सांडपाणी प्रकल्प राबविण्यात आला.
लोकसंख्या – 7690
कुटुंब – 1745
समाविष्ट गावे – चौक,हातणोली,जांभिवली,नानिवली,मोरबे
शाळा – 8
दवाखाना – ग्रामीण रुग्णालय
प्राप्त पुरस्कार –
माझी वसुंधरा अभियान 5.0 (विभाग स्तरीय प्रथम क्रमांक)
निर्मलग्राम पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
ISO 2015 मानांकन प्राप्त
